"अहो तुमची मुलगी आता नोकरीला लागून दोन वर्ष होतं आली ना?"यंदा कर्तव्य आहे !!!
" "
एवढा संवाद केवळ एका बाजूचा ऐकून सुद्धा माझी धडकी भरली. मनात म्हटलं भरले आपले दिवस आता. मग
शक्य तितका चेहरा वाईट करून आई कडे पाहत राहिले तेव्हा ती काय समजायचे ते
समजली आणि तिने काहीतरी कारण सांगून यंदा कर्तव्य नसल्याचं कळवलं आणि माझा
जीव भांड्यात पडला. एकदा का गद्धे पंचविशी पार झाली कि एकूणच सगळ्या
नातेवाईकांच्या नजरेत आपली लग्नाच्या बाजारातली so called value दिसायला
लागते आणि मग त्याचा दृश्य परिणाम म्हणून मग ते अमुकचा तमुक लग्नाचा आहे
अशी सुरुवात करून आपापल्या परीने पर्याय सुचवायला लागतात . अशा वेळी
family functions attend करणं मग शिक्षा वाटायला लागते. अशी functions
चुकवणं निदान आपल्या हातात तरी असतं पण शेजाऱ्यांच्या कचाट्यातून सुटणं
मात्र फार अवघड असतं . ते तर अक्षरश: बारीक लक्ष ठेवून असतात आपल्या प्रत्येक गोष्टींवर . " फार उशीर होतो नाही हल्ली तुला ?"
" आज सुट्टी असते ना तुला मग कुठे निघालीस एवढी तयार होऊन?"
" आज सुट्टी असते ना तुला मग कुठे निघालीस एवढी तयार होऊन?"
एक ना दोन हजार चौकाशांनी अगदी बेजार व्हायला होतं . पण ते आपला शेजारधर्म पाळत असतात त्याला आपण तरी काय करणार.असो या एकंदर सगळ्या चौकश्या आणि "स्थळ" सुचवण्यातून माझी मात्र मस्त करमणूक होत असते