Wednesday, August 19, 2009

असंबद्ध

कोंडमारा असह्य होतोय.. कित्येक वेळा उगाचच नसते त्रास आपण का करून घेतो ? या प्रश्नाला खरतर ठाम अस उत्तर नाही .. कधी कधी प्रश्नही तेवढा गंभीर नसतो पण आपल्या जीवाला मात्र घोर लागून राहतो .. सगळेच प्रश्न काही सांगून बोलून सुटत नसतात...काही वेळा तर ते चक्क सोडून दिल्यानेही सुटतात पण ते सोडल्याने सुटतीलच याची शाश्वती नाही उलट कधीकधी तर ते अधिकच गहन होत जातात. खरच आपण अस का वागतो? काय मिळत आपल्याला एखाद्याला दुखवून ? पण कळत नकळत आपल्या कडून आपलेच दुखावले जातात.. आणि बऱ्याचदा आपल्याला याची साधी जाणीव सुद्धा नसते ... अस का व्हावं ? एकदा हा प्रश्नांचा गुंता सोडवायला बसलं की तो अधिकच गुंतत जातो.