Monday, August 26, 2013

यंदा कर्तव्य आहे !!!
"अहो तुमची मुलगी आता नोकरीला लागून दोन वर्ष होतं आली ना?"
"हो"
"मग काही "स्थळं " वैगरे बघताय कि नाही तिच्यासाठी?"
"  "
"नाही माझ्या मैत्रिणीचा मुलगा आहे हो एकुलता एक आणि तोही engineer  बरं  का?"
" असं का ? माझी मुलगी सुद्धा BE  आहे "
"अच्छा Bsc  का?"
 "नाही हो BE  म्हणजे ती सुद्धा Engineer च आहे. "
"काय सांगता ? वा वा छान . आणि हो मुलगा मुंबईतच नोकरी करतो , स्वतःची जागा आहे अंबरनाथला. मग काय म्हणताय पुढे जायचं का?"
एवढा संवाद केवळ एका बाजूचा ऐकून सुद्धा माझी धडकी भरली. मनात म्हटलं भरले आपले दिवस आता. मग शक्य तितका चेहरा वाईट करून आई कडे पाहत राहिले तेव्हा ती काय समजायचे ते समजली आणि तिने काहीतरी कारण सांगून यंदा कर्तव्य नसल्याचं कळवलं आणि माझा जीव भांड्यात पडला. एकदा का गद्धे पंचविशी पार झाली कि एकूणच सगळ्या नातेवाईकांच्या नजरेत आपली लग्नाच्या बाजारातली so called value  दिसायला लागते आणि मग त्याचा दृश्य परिणाम म्हणून मग ते अमुकचा तमुक लग्नाचा आहे अशी सुरुवात करून आपापल्या परीने पर्याय सुचवायला लागतात . अशा वेळी family  functions  attend करणं मग शिक्षा वाटायला लागते. अशी functions चुकवणं निदान आपल्या हातात तरी असतं पण शेजाऱ्यांच्या कचाट्यातून सुटणं मात्र फार अवघड असतं . ते तर अक्षरश:  बारीक लक्ष ठेवून असतात आपल्या प्रत्येक गोष्टींवर . " फार उशीर होतो नाही हल्ली तुला ?"
" आज सुट्टी असते ना तुला मग कुठे निघालीस एवढी तयार होऊन?" 
एक ना दोन हजार चौकाशांनी अगदी बेजार व्हायला होतं . पण ते आपला शेजारधर्म पाळत असतात त्याला आपण तरी काय करणार.असो या एकंदर सगळ्या चौकश्या आणि "स्थळ" सुचवण्यातून  माझी मात्र मस्त करमणूक होत असते

Saturday, August 3, 2013




काळाच्या ओघात लिहिण  मागे पडलं . दिवसागणिक priorities बदलत गेल्या. जे काही वाटतय ते कोणापाशी तरी बोलून मन मोकळ करायची सवय जडली आणि मी लिहायचं विसरूनच गेले. आज जेव्हा मनात खूप काही साचलय ते कोणासमोर रितं करायची  सोय उरलेली नाहीये म्हणून मग शेवटी पुन्हा लिहावं लागतंय.
खूप खोलवर दुखावल्यागत झालंय आज. म्हणजे मनात नसताना सुद्धा आपण एखादी गोष्ट ठरवतो आणि मग ती गोष्ट पाळण खूप अवघड आहे याची जाणीवही होते आपल्याला पण तरीही केवळ आपण ती गोष्ट कोणासाठी तरी मन मारून पाळतच राहतो. त्यामागे  आपला काही एक उद्देश असतो पण अचानक आपल्याला कळून चुकत कि आपल्या या मन मारून राहण्याला काडीचीही किंमत नाहीये कारण ज्या कोण्या कारणासाठी आपण हे सगळ करतोय मुळात त्याचा उद्देशच सफल होत नाहीये तेव्हा अगदी हताश वाटायला लागतं तसंच काहिसं माझं सध्या झालय. त्यावर मग उपाय म्हणून मी blog खरडत बसलेय. पण त्यानेही काही फरक पडत नाहीये.
त्रागा करून तसंही काही साध्य होणार नाहीच म्हणून इथेच थांबते