Saturday, August 3, 2013




काळाच्या ओघात लिहिण  मागे पडलं . दिवसागणिक priorities बदलत गेल्या. जे काही वाटतय ते कोणापाशी तरी बोलून मन मोकळ करायची सवय जडली आणि मी लिहायचं विसरूनच गेले. आज जेव्हा मनात खूप काही साचलय ते कोणासमोर रितं करायची  सोय उरलेली नाहीये म्हणून मग शेवटी पुन्हा लिहावं लागतंय.
खूप खोलवर दुखावल्यागत झालंय आज. म्हणजे मनात नसताना सुद्धा आपण एखादी गोष्ट ठरवतो आणि मग ती गोष्ट पाळण खूप अवघड आहे याची जाणीवही होते आपल्याला पण तरीही केवळ आपण ती गोष्ट कोणासाठी तरी मन मारून पाळतच राहतो. त्यामागे  आपला काही एक उद्देश असतो पण अचानक आपल्याला कळून चुकत कि आपल्या या मन मारून राहण्याला काडीचीही किंमत नाहीये कारण ज्या कोण्या कारणासाठी आपण हे सगळ करतोय मुळात त्याचा उद्देशच सफल होत नाहीये तेव्हा अगदी हताश वाटायला लागतं तसंच काहिसं माझं सध्या झालय. त्यावर मग उपाय म्हणून मी blog खरडत बसलेय. पण त्यानेही काही फरक पडत नाहीये.
त्रागा करून तसंही काही साध्य होणार नाहीच म्हणून इथेच थांबते

No comments:

Post a Comment