" हल्ली खूप उद्धट झालीयस " इति आई
" तुझ्याशी बोलणंच कठीण होऊन बसलंय " तमाम मित्रपरिवार
" आधी कमवायला शिका आणि मग काय उधळायचे ते उधळा " आमचे तीर्थरूप
" केलीस थोडी तडजोड तर काय बिघडणार आहे तुझं "
आता हे शेवटचं वाक्य कोणाचं आहे ते नेमकं आठवत नाहीये
पण सहसा हि अशीच वाक्य सतत माझ्या कानीकपाळी मारली जात आहेत. तसं पाहता वरवर हि गोष्ट माझ्यासारख्या नालायक व्यक्तीसाठी नेहमीचीच पण आता मात्र दररोज घरी असल्याने दिवसाचे २४ तास यांचा सामना करावा लागतोय. " मौनं सर्वार्थ साधनम " हि उक्ती माझ्यासारख्या फटकळ पामराला तरी किती दिवस आचरता येणार. शेवटी व्हायचं तेच झालं समोरून येणाऱ्या प्रत्येक वाक्बाणाला मी तितक्याच धारदारपणे उत्तर द्यायची नीती अवलंबिली आणि घरादारासकट सगळ्यांशी वैर पत्कारलं. हे सगळं आता किती दिवस आणि कधीपर्यंत चालणार याची अजून तरी मला काहीच कल्पना नाही पण शक्यतो मी लवकरात लवकर या सगळ्याचा निकाल लावण्याचा प्रयत्न करेन जेणेकरून हे शीत(?)युद्ध थंड करता येईल...
This comment has been removed by the author.
ReplyDeletePls register on naukri.. monster... timesjob... n freshershub.... U'll find the solution to ur problm..!!! :P :P :P
ReplyDeletethanks vrush!!!!
ReplyDelete