मला नाही आवडत
तुझं आत्ममग्न राहणं,
विचारांच्या गर्दीत असं
राजरोस विरून जाणं.
तुझं अगदी जवळ असणंही
मला केव्हा केव्हा डाचतं,
कारण तेव्हाही स्वतः त
हरवून बसणं तुला सोप्पं वाटतं .
किती म्हणून छळावं
माणसानं एखाद्याला ,
आधी वेड लावून मग
खुशाल विसरून जावं बिचारयाला.
असं सगळं असलं तरी
मन तुझ्याकडेच धावतं ,
समज-गैरसमजाच्या धुक्यात
तुलाच शोधू पाहतं.
Aeyyy LOVE STRUCK....!!! Dukhi atma....
ReplyDeletetula kay sagle asech characters miltat ka... je mullinna bhav det nahi..???
chan ahe.......
ReplyDeleteshevati sagalech kami jast farakane sarakhe asatat..